शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

रस्त्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याला वीस कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जे रस्ते व्यवस्थित केल्याने जिल्ह्याची प्रतिमा बदलणार आहे अशा रस्त्यांच्या ‘विशेष दुरुस्ती’साठी प्रत्येक जिल्ह्याला २० कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाºयांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.या विभागातील ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जे रस्ते व्यवस्थित केल्याने जिल्ह्याची प्रतिमा बदलणार आहे अशा रस्त्यांच्या ‘विशेष दुरुस्ती’साठी प्रत्येक जिल्ह्याला २० कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाºयांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.या विभागातील रस्त्यांच्या स्थितीचा यावेळी पाटील यांनी आढावा घेऊन दर्जेदार कामाचेही अधिकाºयांना आवाहन केले. यावेळी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता पी. एम. पिडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव आर. डी. जोशी, अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, एन. एम. वेदपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांमध्ये उच्च दर्जाचे रस्ते झाले नाहीत. शासनाने रस्त्यांसाठी गेल्या तीन वर्षांत तीन हजार कोटींपासून सात हजार कोटींपर्यंतचा निधी वाढवत नेला आहे. पुढील दोन वर्षांत राज्यांत ४० हजार किलोमीटरचे रस्ते होतील. २२ हजार किलोमीटरचे चौपदरी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकामकडील १० हजार किलोमीटरचे तीन पदरी रस्ते आणि ‘भारतमाला’मधून ६ हजार ५०० किलोमीटरचे सहा पदरी रस्त्यांची कामे होणार आहेत. पाटील म्हणाले गेल्या तीन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने २ हजार जणांना पदोन्नती दिली आहे. आणखी १०० जणांना देण्यात येणार आहे; पण २०० जणांना निलंबितही करण्यात आले आहे.‘दादां’चा वडीलकीचा सल्लादिवसातील अर्धा तास तरी स्वत:साठी जगा. आपल्या आवडीचे छंद जोपासा. कुटुंबाला पुरेसा वेळ द्या. आपआपल्या जीवनसाथीचे म्हणणे नीट समजून घ्या, ऐकून घ्या. सामाजिक उत्तरदायित्व जाणीवपूर्वक जोपासा. संयमाने ऐकण्याची स्वत:ला सवय लावा, समोरच्याचे व्यवस्थित ऐकून घेतल्याने ९० टक्के प्रश्न सुटतात. यातून कार्यालयीन संस्कृतीत विश्वास, जिव्हाळा, एकोपा वाढतो. अशा चांगल्या कार्यसंस्कृतीची आज देशाला गरज आहे, असा वडीलकीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.